वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायत

सरपंच किंवा उप-सरपंच मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे रिक्त झालेले पद भरणे संदर्भात सविस्तर माहिती

आपण या लेखात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४३ नुसार ग्रामपंचायत मधील रिक्त झालेले पद भरणे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४३ अन्वये रिक्त पद भरणे नियम:

सरपंच किंवा उप-सरपंच असमर्थ झाल्यामुळे, मरण पावल्यामुळे, त्याने राजीनामा दिल्यामुळे, अनर्हतेमुळे, अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यामुळे परवानगीशिवाय अनुपस्थितीत राहिल्यामुळे किंवा त्याला पदावरून काढून टाकल्यामुळे जे रिकामी झाले असेल व जे रिकामी झाल्याविषयी विहित केलेल्या रीतीने जिल्हाधिकाऱ्याला सूचना देण्यात आलेली असेल असे कोणतेही रिकामे पद, सरपंच किंवा उपसरपंच यांची निवड करून भरले जाईल. आणि तो सदस्य, ज्या सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या जागी निवडून आला असेल त्या सरपंचाने किंवा उपसरपंचाने ते पद रिकामे झाले नसते तर जितक्या मुदतीपर्यंत पद धारण केले असते तितक्याच मुदतीपर्यंत पद धारण करील.

१) सरपंचाने किंवा यथास्थिती, उपसरपंचाने रिक्त झालेले पद, ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरण्यात येईल.

>

२) थेट निर्वाचित सदस्याचे पद, रिक्त झाले असेल तर, ते पद, असे पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, पंचायतीचे सदस्य यांच्यामधून निवडणुकीद्वारे भरण्यात येईल.

३) पोट- कलम (१) अन्वये सरपंचाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सभा कलम ३३, पोट- कलम (१) मध्ये वर्णन केलेल्या रीतीने जिल्हाधिकाऱ्याने बोलावली पाहिजे.

जागा रिकामी असल्यामुळे पंचायतीच्या कामकाजास बाधा न येणे:

१) पंचायतीच्या कोणत्याही सदस्यांची जागा रिकामी असेल त्या मुदतीत सदस्यत्व चालू असलेल्या सदस्यांना, कोणतीही जागा रिकामी झाली नाही, असे समजून काम चालवता येईल.

२) पंचायतीच्या सदस्यांची जागा रिकामी झाली असली किंवा तिच्या रचनेत कोणताही दोष असला तरी कलम १४५, पोट – कलम ( १ अ ) च्या उपबंधास अधीन राहून तिला कार्य करण्याचा अधिकार असेल आणि पंचायतीचे कामकाज चालू असताना ज्या व्यक्तीला तेथे बसण्याचा, मत देण्याचा किंवा अन्यथा त्यात भाग घेण्याचा हक्क नव्हता अशी एखादी व्यक्ती त्या ठिकाणी बसली, तिने मत दिले किंवा अन्यथा अशा कामकाजामध्ये भाग घेतला असे मागाहून दिसून आले असेल, तरी पंचायतीचे असे कामकाज वैध असेल.

(३) पंचायतीचे कोणतेही कृत्य किंवा कामकाज हे, प्रकरणाच्या गुणावगुणास बाधा न आणणाऱ्या अशा कोणत्याही कृत्यातील किंवा कामकाजातील कोणत्याही दोषांमुळे किंवा अनियमिततेमुळे किंवा कोणत्याही सदस्यावर नोटीस बजावण्यामध्ये झालेल्या कोणत्याही अनियमिततेमुळे किंवा केवळ अनौपचारिकतेमुळे अवैध आहे असे मानले जाणार नाही.

हेही वाचा – ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य निरर्हता/अपात्र नियम विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.