नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सन 2020-2021

इंधनाची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारण्याचे आवाहन केले. पशुपालक शेतकऱ्यांच्या इंधनात बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. याशिवाय बायोगॅस संयंत्राला जोडून शौचालय उभारणीसाठी १ हजार सहाशे रुपयाचे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हा बायोगॅस संयंत्र उभारणीचा उपक्रम राबवला जातो.

नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र शासनाने आदेशान्वये सादर योजनेसाठी सन 2020-21 करीता राज्य शासनास वितरित केलेला आहे.

संदर्भीय आदेश क्र. 6 अन्वये “नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खतव्यवस्थापन कार्यक्रम (NNBOMP)” या योजनेच्या अनुषांगाने, निधी आहरण व संवितरण करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाकडून सण २०२०-२१ या आर्थिक वर्षांकरिता राज्यात ७००० बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट कळविलेले आहे. सदर उद्दिष्टांच्या अनुषंगाने सण २०२०-२१ या वर्षांकरिता अनुदान वितरित करण्याच्या अनुषंगाने रक्कम राज्यस्तरावरील PFMS प्रणालीसाठी नोंदणी करण्यात आलेल्या बँक बचत खात्यात जमा करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.