कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी 25 मार्चपासून विशेष मोहीम

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात उत्तम काम सुरु असून 8 लाख 86 हजार शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यासाठी 25 मार्चपासून संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू पवार आणि अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेची महसूल, कृषि, ग्रामविकास आणि सहकार या विभागांच्या संयुक्तपणे राज्यात अंमलबजावणी सुरु आहे.

या योजनेचा लाभ सर्व लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करुन ती पीएम-किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.

थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे नोंदणीकृत पात्र लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असून 15 मार्च 2022 अखेर एकूण 109.33 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 18120.23 कोटींची रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली असून पात्र लाभार्थींना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चर्चेत सदस्य अभिमन्यू पवार यांचेसह राधाकृष्ण विखे-पाटील, ॲड. राहुल कुल आदींनी भाग घेतला.

हेही वाचा – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : आधार आणि बायोमेट्रिक eKYC प्रोसेस कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan Aadhar and Biometric eKYC)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.