आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Sangli District

मा. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं १७१६/प्र.क्र./५१७/३९ दिनांक १९ जानेवारी, २०१८ रोजीच्या शासन निर्णयात जिल्हयात सध्या शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू), महा ई सेवा केंद्र तसेच संग्राम केंद्रांची यादी जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करून शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त पदांची यादीसुध्दा जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करावी अशी सूचना देण्यात आली आहे.

रिक्त पदांसाठी नवीन आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागविणेत यावेत. प्राप्त अर्जाची तांत्रिक समितीकडून चौकशी करुन छाननीअंती प्राप्त अर्जदारांना नवीन आपले सरकार केंद्र देणेबाबतची पूर्वीच्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू), महा ई सेवा केंद्र (सध्या महाऑनलाईन नावाने) तसेच संग्राम केद्रांना आपले सरकार सेवा केंद्र हा दर्जा देणेबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार सांगली जिल्हयातील C.S.C. (कॉमन सर्व्हिस स सेंटर) धारकांना व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील त्या भौगोलीक क्षेत्रात राहणारी कोणतीही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरु नसेल परंतू जो C.S.C. (कॉमन सर्व्हिस सेंटर) S.P.V. (स्पेशल पर्पज व्हेईकल) चे केंद्र मिळण्यासाठीच्या विहित नमुन्याच्या अर्जातील शर्ती पूर्ण करीत असेल अशा व्यक्तींना सूचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा व अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती शहरी व ग्रामीण भागात नव्याने दयावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांची यादी सांगली जिल्हयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील सामान्य शाखेतील प्रशासन -1 संकलनाकडे छापील स्वरुपात उपलब्ध करुन देणेत आला आहे. सदरचा अर्ज अचूक व परिपूर्ण भरुन सोबतच्या अटी शर्तीस अधीन राहून सादर करावा.

अर्ज स्वीकारणेचा कालावधी व ठिकाण :

दिनांक: 06/01/2022 ते 20/01/२०२२ अखेर कार्यालयीन वेळेत ( शासकीय कामकाजाचे दिवशी) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील आवक बारनिशी संकलनाकडे समक्ष स्वीकारून पोहोच देणेत येईल.

आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकामीच्या अटी व शर्ती:

१. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान ( सा.प्र.वि. ) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं १७१६/प्र.क्र.५१७/३९ दिनांक १९ जानेवारी, २०१८ मधील निकष, कार्यपध्दती, सुविधा, जबाबदा-या कारवाईची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेस अधीन राहून केंद्राची नियुक्ती करून केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वेळोवेळी प्रसिध्द होणारे शासन निर्णय/परिपत्रक/शुध्दीपत्रकात दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करणेत येईल.

२. उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.

३. उमेदवार हा किमान १० वी उत्तीर्ण असावा.

४. अर्जदारास मराठी भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे.

५. अर्जदारांना इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान व संगणक कौशल्या बाबतचे ( MS – CIT / CCC ) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

६. उमेदवार हा गुंतवणूकीचे दृष्टीकोनातून सक्षम असला पाहीजे.

७. एखाद्या जागेसाठी एक पेक्षा जास्त CSC ID अस्तित्वात असणाऱ्या CSC केंद्र चालकांनी अर्ज केल्यास ज्या CSC केंद्राची उलाढाल/व्यवहारांची संख्या अधिक असेल अशा CSC केंद्र चालकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

८. उमेदवाराने संगणक साहित्य व इतर अनुषंगीक साहित्य व जागा उपलब्ध असलेबाबत योग्य तो तपशिल जोडणे आवश्यक आहे.

९ . CSC ID अस्तित्वात असणा-या B2C सेवा देणा-या केंद्र चालकांनी अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य क्रमाने आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येईल.

१०. आपले सरकार सेवा केंद्र धारक म्हणून पात्र ठरल्यास एक महिन्याचे आत संबंधित पोलीस स्टेशन चे चारीत्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

११. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबत दिनांक १९ जानेवारी, २०१८ च्या शासन निर्णयाला अधिन राहून केंद्राची नियुक्ती केली जाईल. तसेच अवेदकांना अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.

१२. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा अर्जदार हा त्या गावातील रहिवाशी असावा. जर त्या गावातील पात्र अर्ज आले नसेल तर इतर इच्छुक पात्र अर्जदारांचा विचार करणेत येईल.

१३. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा ( Software ) इ. योग्य वापर संरक्षण व जतन करणे अवेदकांना बंधनकारक राहील.

१४. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरुपाची चूक समजून केंद्र रद्द करणेत येईल.

१५. संबंधित अर्जदार यांना जिल्हयामध्ये ( शहरी किंवा ग्रामीण भागात फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रा ” साठी अर्ज करता येईल. (एका पेक्षा जास्त केंद्रासाठी अर्ज भरल्यास एकाच केंद्रास नियमानुसार मान्यता देणेत येईल.)

१६. ग्रामीण व शहरी भागात नव्याने द्यायच्या ऑनलाईन यादीनुसारच अर्ज सादर करावा. इतर ठिकाणासाठी मागणी केलेस आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

१७. अर्जदार यांना अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयातील NIC विभाग, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांचेकडून अधिक माहिती प्राप्त करून घ्यावी. इतर त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज सादर करु नये.

१८. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच त्यांना केंद्राबाबत मागविलेला अहवाल तात्काळ सादर करावा लागेल.

१९. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून ऑनलाईन पध्दतीने देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरीकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

२०. निर्गत केलेल्या दाखल्याच्या / प्रमाणपत्राच्या स्थळप्रती पुढील महिन्यात संबंधित अधिकारी कार्यालयात/तहसिल कार्यालयाच्या अभिलेखात जमा करणे बंधनकारक राहील.

२१. अर्जामध्ये भरलेली माहिती चूकीची आढळल्यास त्यांचा अर्ज रदद करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणेत येईल.

२२. सदरचे आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. याकामी त्रयस्थ व्यक्तीबरोबर अर्थिक व्यवहार झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

२३. सांगली जिल्ह्यात कोठेही आपले सरकार केंद्र पूर्वी दिलेले असेल तर त्यास पुन्हा दुसरे केंद्र देता येणार नाही (एका व्यक्तीस एकच केंद्र देण्यात येईल).

२४. ज्या व्यक्तीस केंद्र मिळेल त्याने ते केंद्र दुस-या व्यक्तीस चालविण्यास देता येणार नाही.

२५. परिपूर्ण भरलेला अर्ज दिनांक ०६/०१/२०२२ ते २०/१/२०२२ या कालावधीत शासकीय कामकाजाचे दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ०६.१५ या वेळेतच जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील आवक बारनिशी मध्येच समक्ष सादर करून त्याची पोहोच पावती घ्यावी. इतर कोणत्याही मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

२६. जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त असलेल्या समितीस अर्ज छाननीबाबत सर्व अधिकार असतील.

२७. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रदद करणेचे अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, जिल्हा ई – गव्हनन्स सोसायटी ), तथा जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे राखून ठेवणेत आले आहेत.

२८. सदर जाहिरात मधील अटी शर्ती वगळता परिस्थितीनुसार इतर कोणतेही मूल्यमापनाचे निकष लावण्याची आवश्यकता असल्यास ते सर्व निकष ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, सांगली यांना राहतील.

२९ . वर नमूद अटी व शर्तीचा भंग झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता केंद्र रद्द करणेत येईल.

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना सांगली जिल्हा (Aapale Sarkar Seva Kendra Sangli District – Notification):

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना, अर्ज नमुना PDF फाईल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: https://sangli.nic.in

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.