घरबसल्या ई-पीकपाहणी येत्या खरिपापासून रद्द, खोट्या नोंदींमुळे निर्णय
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतात न जाता घरात बसून ईपीक पाहणी करण्याचे जी सोय सरकारने शेतकऱ्यांसाठी दिली होती ती आता सोय बंद होणार आहे येत्या खरीप पीक हंगामात घरबसल्या पिक पाहणी करता येणार नाही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊनच ई पीक पाहणी ची नोंद करता येणार आहे यामध्ये बरेच काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता खोटी पीक पाहणी दाखवता येणार नाही. काही खोट्या नोंदींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करण्याची सुविधा येत्या खरिपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात ५० मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीकपाहणीची नोंद होणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
ई-पीक पाहणीच्या कामात होणारे बदल :
- गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई-पीकपाहणी करता येणार नाही.
- प्रत्यक्ष शेतात ५० मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र अपलोड होईल.
- तलाठी स्तरावर ई-पीकपाहणीत छायाचित्र आता काढावे लागणार आहे.
- ई-पीकपाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खासगी सहायक करतील. प्रत्येक गावाला एक सहायक मिळणार आहे.
- सहायकांना तलाठ्याच्या अखत्यारित कामे करावी लागतील. त्यांना केवळ मानधन दिले जाईल.
भूमी अभिलेख आयुक्त नि. कु. सुधांशू व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूकडून सध्या नव्या ई-पीकपाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. “केंद्राने आता राज्या राज्यांतील स्वतंत्र ई-पीकपाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सव्हें (डीसीएस) पद्धत येत्या खरिपापासून लागू केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई-पीकपाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात, केंद्राने दिलेले उपयोजन (अॅप्लिकेशन) राज्याने स्वीकारलेले नाही. त्याऐवजी राज्याने आधीच्या ई-पीकपाहणी अॅपमध्येच काही बदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अॅपमधून खरीप २०२४ ची ई-पीकपाहणी करता येईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
महत्वाच्या तारखा:
- चालू रब्बीत ई-पीकपाहणीची सुविधा शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंतच राहील.
- १६ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान फक्त तलाठ्यांना पीकपाहणी करतील.
- केंद्राची चालू रब्बीतील पथदर्शक डीसीएस ई-पीकपाहणीची मुदत १५ जानेवारी २०२४ रोजी संपली आहे.
- डीसीएस ई-पीकपाहणीची रब्बीची फक्त तलाठ्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत २०२४ चालू राहील.
- पुढील खरिपासाठी ई-पीकपाहणीची सुविधा १५ जुलै २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता.
हेही वाचा – ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप वापरण्यात येणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!