वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा

इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच, या योजनेंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयामध्ये परि.७, ८, ९ (४). ९१५) व ९ (६) मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि.८ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

वरील समिती समोर इयत्ता १ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुला/मुलींकरीता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/शिक्षण निरीक्षण, (योजना), बृहन्मुंबई यांची राहील.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (१) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

>

पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ३ प्रतीत (विवरणपत्र-अ) संबंधित मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला/मुलींकरीता शिक्षणाधिकारी, (योजना) /शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांच्या कडे दाखल करावा. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी, (योजना)/शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे बैठकीच्या वेळी सादर करावी.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (४) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी, (योजना) / शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हफ्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ७ दिवसात जमा करावे.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (५) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/शिक्षण निरीक्षक, (योजना), बृहन्मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDC) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयातील परि. ९ (६) खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. शिक्षण संचालक (योजना) यांनी ह्या योजनतेची योग्य ती प्रसिद्धी करावी, वेळोवेळी सर्व संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय: इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना – Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Grant Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.